रविवार, २४ जानेवारी, २०२१

SSC-HSC Exam Date: दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली!


SSC-HSC Exam Date: दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा......

बारावीची लेखी परीक्षा येत्या 23 एप्रिल पासून सुरु होणार आहे. तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे दरम्यान घेतली जाईल.

कोरोना संकटात गेल्या मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र दहावी-बारावीची परीक्षा कशी होणार, कधी होणार हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला होता. दहावी-बारावी परीक्षेबाबतची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. बारावीची लेखी परीक्षा येत्या 23 एप्रिल पासून सुरु होणार आहे तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे दरम्यान घेतली जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहपरीक्षा पार पडल्यानंतर बारावीचा निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. तर दहावीचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा 1 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे.कोरोनामुळे दहावी-बारावी परीक्षेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरु होणाऱ्या परीक्षा उशीराने होत आहे. सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. शिवाय लॉकडाऊन काळातही ऑनलईन वर्ग सुरु होते. राज्यात नववी ते बारावीच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे. 18 जानेवारी रोजी 21,66,056 विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत, तर 21287 शाळा सुरू आहेत. सुमारे 76.8 टक्के विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत. हे उत्साहवर्धक चित्र आहे.

कोविड 19 च्या संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असं वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोरोनाच्या काळात अनेक शालेय विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे व त्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे, वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. विद्यार्थी व पालकांनी या संदर्भात काही तक्रारी असतील तर स्थानीक शिक्षण अधिकारी वर्गाकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

स्त्रोत - ABP NEWS

महापोर्टल रद्द, नोकरभरतीसाठी सरकारकडून चार कंपन्यांची निवड...


महापोर्टल रद्द, नोकरभरतीसाठी सरकारकडून चार कंपन्यांची निवड....

राज्यातील रखडलेल्या नोकरभरतीला अखेर सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील 8500 आणि पोलीस विभागातील पाच हजार 297 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांच्या मनात आशेचा किरण दिसला आहे. परंतु राज्य सरकार महापोर्टलऐवजी चार नव्या कंपन्यांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया करणार आहे.

महापोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या नोकर भरतीला अनेकांनी विरोध केला होता. त्यामुळे राज्य सरकारने महापोर्टल रद्द करुन राज्य सरकारने चार कंपन्यांची निवड केली आहे. या कंपन्या आता भरती प्रक्रिया करणार आहेत. निवडण्यात आलेल्या चार कंपन्यांद्वारे इथून पुढे पदभरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. लवकरच याबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, अशी माहिती राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्वीट करुन दिली आहे.


शासनचा निर्णयात काय म्हटलंय?


महापरीक्षा पोर्टल अतंर्गत येणाऱ्या परीक्षा पद्धतीत बदल करुन सुधारित परीक्षा पद्धतीनुसार सर्व्हिस प्रोवायडरची निवड करण्याची प्रक्रिया आणि जबाबदारी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई (महा आयटी) यांच्याकडे देण्यात आली होती. त्या विभागानं निवड करुन सादर केलेल्या माहितीनुसार 4 कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.


1. मेसर्स अॅपटेक लिमिटेड
2. मेसर्स जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रयाव्हेट लिमिटेड
3. मेसर्स जींजर वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड
4. मेसर्स मेटा-आय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड


या चार कंपन्यांना महाराष्ट्रातील आगामी पाच वर्षांतील मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, त्याच्या अधिपत्याखालील शासकीय विभाग, एमएपीएसी च्या कार्यकक्षेबाहेरील गट ब आणि गट क च्या परीक्षा पद्धती राबवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.

13 हजारांपेक्षा जास्त पदांसाठी

राज्यातील या महाभरती प्रक्रियेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पोलीस विभागात 5 हजार 297 पदं आणि आरोग्य विभागात 8 हजार 500 अशा एकूण 13 हजार 800 पदांची भरती होणार आहे. दरम्यान मराठा नेत्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे.

साभार - ABP न्युज नेटवर्क 




शनिवार, २३ जानेवारी, २०२१

पुन्हा एकदा नोटबंदी?


पुन्हा एकदा नोटबंदी? आरबीआयकडून ‘या’ नोटा चलनातून बाद करण्याच्या हालचाली सुरु......


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद होण्याची शक्यता आहे. आरबीआयचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी महेश यांनी ही माहिती दिली आहे. मार्च किंवा एप्रिलपर्यंत आरबीआय १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. फ्री प्रेस जर्नलने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

जिल्हास्तरीय सुरक्षा समिती आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आरबीआयकडून बँकांना नोटा परत घेण्याची मोहीम आखण्यास सांगण्यात आलं आहे. यामुळे बँकेत जमा झालेल्या १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा पुन्हा चलनात येणार नाही यासाठी बँकांनी तयारी केली आहे.

यावेळी बी महेश यांनी १० रुपयांच्या नाण्याला अद्यापही व्यापारी तसंच उद्योजकांकडून स्वीकारलं गेलं नसल्यावरुन नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, "१० रुपयांचं नाणं आणून १५ वर्ष झाल्यानंतरही व्यापारी आणि उद्योजकांनी त्याचा स्वीकार न करणं बँका आणि आरबीआयसाठी मोठी समस्या झाली आहे. १० रुपयांची नाणी बँकांसाठी मोठं ओझं झालं आहे".

यावेळी त्यांनी नाण्याच्या वैधतेसंबंधी अफवा पसरत असून लोकांना याबद्दल जागरुक करण्याची गरज बोलून दाखवली. लोकांनी १० रुपयांचं नाणं जास्तीत जास्त वापरावं यासाठी बँकांनी मार्ग शोधण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. २०१९ मध्ये आरबीआयने १०० रुपयांची नवी जांभळ्या रंगातील नोट आणली होती. बी महेश यांनी १०० च्या नव्या नोटा चलनातून बाद होणार नाहीत असं स्पष्ट केलं आहे.

- लोकसत्ता न्युज नेटवर्क

शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१

समाजमाध्यम कंपन्यांचा वरचष्मा.......

 



समाजमाध्यम कंपन्यांचा वरचष्मा.......

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता पायउतार झाले असले तरी त्यांनी त्याआधी सत्तांतर सुकरपणे घडू दिले नाही. प्रतिनिधिवृंदाच्या मतांची गणना सुरू असताना कॅपिटॉल हिल या अमेरिकी संसदेच्या इमारतीत त्यांच्या समर्थकांनी धुडगूस घातला. पण या लोकांची जमवाजमव करण्यात त्यांच्या ट्विटर खात्याची मदत झाली. त्यामुळे आता ट्विटर, फेसबुक, यू टय़ूब यांच्यासह सर्वानीच त्यांच्या खात्यांवर बंदी घातली आहे.

बंदी चांगली की वाईट?

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तांतरही सुकरपणे होऊ देणार नाही असा इशारा दिला होता. त्यासाठी त्यांनी ट्विटरची मदत घेतली हे खरे, त्यामुळे त्या अर्थाने बंदी योग्यच आहे यात शंका नाही. पण यात एक वेगळा भाग असा, की समाजमाध्यम क्षेत्रातील रग्गड नफा कमावणाऱ्या कंपन्या लोकशाही देशांची प्रक्रिया चालवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात हेही यातून सिद्ध झाले आहे. एकीकडे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करताना दुसरीकडे खोटय़ा बातम्या व द्वेषमूलक आशय काढून टाकणे ही तारेवरची कसरत होती. समाजमाध्यम कंपन्यांनी योग्य तेच केले असे काहींचे म्हणणे होते, तर दुसरीकडे यातून या कंपन्यांची सर्व लोकशाही प्रक्रिया किंवा एखाद्या बलाढय़ व्यवस्थेस, नेत्यास वाकवण्याची क्षमताही दिसून आली. युरोपीय समुदायात या कंपन्यांना वेगळे नियम आहेत त्यामुळे त्यांनी ट्रम्प यांना ट्विटरवरून काढण्याच्या मुद्दय़ावर टीका केली.

बंदी कशी घातली गेली?

फेसबुकने हल्ला झाला त्या सकाळीच त्यांचे खाते बंद केले. नंतर ट्विटर, स्नॅपचॅट, शॉपीफाय, ट्विच यांनीही बंदी घातली. ७ जानेवारीला फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी फेसबुक व इन्स्टाग्रामवर ट्रम्प यांचे खाते बंद केल्याचे स्पष्ट केले. प्रा. रमेश श्रीनिवासन यांच्या मते ट्विटर व फेसबुक यांनी, अध्यक्ष ट्रम्प हे सत्तेच्या हस्तांतरात गोंधळ घालू शकतात या कारणास्तव त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीच्या प्रतिसादाखातर ही बंदी घातली. आधी चार वर्षे त्यांनी हे सगळे खपवून घेतले; म्हणजे ही सोयीस्कर भूमिका होती. नंतर ट्रम्प यांना फक्त पार्लरची सेवा उपलब्ध होती, पण नंतर अ‍ॅपल, गूगल यांनी ते अ‍ॅप काढून टाकले. त्यातून अ‍ॅमेझॉन वेब सव्‍‌र्हिसेस या कंपनीची शक्तीच दिसून आली.

धोरण काय?

ट्विटरच्या धोरणानुसार कुठल्याही नागरी धोरणावर प्रभाव टाकण्यासाठी त्याचा वापर करता येत नाही. त्यात लोकांची दिशाभूल करणारी छायाचित्रे व मजकूर टाकता येत नाही. जनमत, जनगणना यासारख्या प्रक्रियांचा त्यात समावेश होतो. ट्विटर काही खात्यांवर स्वत: नजर ठेवते व खाते बंद करू शकते. काही तक्रारींवरून त्या खऱ्या वाटल्यास खाते बंद केले जाऊ शकते.

बचाव असा..

फेसबुक व ट्विटर यांनी असे म्हटले होते, की काही उच्चपदस्थ वापरकर्ते आमच्या धोरणाचे उल्लंघन करतात तेव्हा अशी कारवाई योग्यच ठरते. एरवी २०१९ मध्ये फेसबुकचे उपाध्यक्ष निक क्लेग यांनी असे म्हटले होते, की राजकीय नेते बातम्यांचा विषय देत असतात. त्याची चर्चा होत असते त्यामुळे त्यांना सूट देण्यात येत होती. ट्विटरने ट्रम्प यांना ‘ब्लॅक लाइव्हज मॅटरच्या वेळी जेव्हा लूट होते तेव्हा गोळीबार सुरू होतो’ या ट्विटरसाठी हटकले होते पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. ट्रम्प यांनी हिंसाचार करणाऱ्या समर्थकांना उत्तेजन देणारे ट्वीट केले होते व त्यांचे ८.८ कोटी अनुसारक त्यावर आहेत. कुठलाही बडा नेता आमच्या नियमांपेक्षा मोठा नाही असे ट्विटरने नंतर सांगितले व नंतर कायमचे त्यांचे खाते बंद केले. मिशेल ओबामा यांनी ट्रम्प यांचे समाजमाध्यम खाते बंद करण्याची मागणी केली होती. त्यामुळे डेमोकॅट्र्सच्या सांगण्यावरून दबाव वाढला असे याबाबत सांगण्यात आले.

साभार - लोकसत्ता 

दरवर्षी 23 जानेवारी या दिवशी भारतात “पराक्रम दिन” साजरा करण्यात येणार...

 



🌀🌀दरवर्षी 23 जानेवारी या दिवशी भारतात “पराक्रम दिन” साजरा करण्यात येणार🌀🌀*

🍄भारत सरकारने येत्या 23 जानेवारी 2021 पासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे 125 वे जयंती वर्ष राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुयोग्य पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.

🍄नेताजींनी देशासाठी नि:स्वार्थ भावनेने केलेल्या सेवेचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने त्यांची जयंती अर्थात 23 जानेवारी हा दिवस “पराक्रम दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

🍄देशातल्या नागरिकांना आणि विशेषत: तरुणांना संकट काळात नेताजींप्रमाणे धैर्याने वागण्याची प्रेरणा मिळावी आणि त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

🍁इतर ठळक बाबी

🍄नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण वर्षभर साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांची औपचारिक सुरुवात 23 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. कोलकता येथे आयोजित केलेल्या उत्सवाच्या उद्‌घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत.

🍄पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली येत्या 23 जानेवारी 2021 रोजी कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे या स्मरणोत्सव कार्यक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे. याप्रसंगी एका सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर, नेताजींच्या जीवन आणि कार्यावर आधारित कायमस्वरुपी प्रदर्शन व प्रोजेक्शन मॅपिंग प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे.
नेताजी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एक विशेष नाणे आणि टपाल तिकीट यांचे विमोचन केले जाणार आहे.

🍄ओडीशाच्या कटक येथे नेताजींच्या जन्मस्थळी देखील संस्कृती मंत्रालय एक कार्यक्रम आयोजित करणार आहे.

🍁नेताजी सुभाषचंद्र बोस (23 जानेवारी 1897 – 18 ऑगस्ट 1945 ?)

🍄सुभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती होते. ‘नेताजी’ ही त्यांना लोकांनी दिलेली उपाधी आहे. त्यांचा जन्म कटकला (ओडीशा) येथे झाला.

🍄1927 साली ते सक्रिय राजकारणात पडले. ते बंगाल प्रांतिक काँग्रेस परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यांनी यूथ लीग स्थापन करून तरुणांना संघटित केले. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही जवाहरलाल नेहरूंबरोबर त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी मिळून 1928 साली इंडिया इंडिपेंडन्स युथ लीगची स्थापना केली.

🍄21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना करण्यात आली. सुभाषबाबू स्वतः राष्टप्रमुख, पंतप्रधान, संरक्षण मंत्री व सरसेनापती झाले. या शासनाला जपान, जर्मनी, इटली, ब्रह्मदेश आदी अकरा राष्ट्रांनी मान्यता दिली. या सरकारने इंग्लंड-अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारून स्वतःची तिकिटे व नोटाही काढल्या. जपानने अंदमान, निकोबार व जित बेटांचा ताबा या सरकारकडे सोपविला. ब्रह्मदेशामधून आझाद हिंद सेना  भारताच्या दिशेने पुढे गेल्या.

🍄सायगावहून 17 ऑगस्ट 1945 रोजी त्यांनी प्रयाण केले. मार्गावर 18 ऑगस्ट रोजी तैपे (तैवान) येथील विमानतळावर विमानास अपघात होऊन त्यांचे निधन झाले, असे समजण्यात येते.

- शैक्षणिक परिवर्तन

गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

पोलीस शिपाई पदे 100% भरण्याबाबत शासन निर्णय

 



📒 पोलीस भरती नवीन शासन निर्णय (GR) 📒*
 

◾️ राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन २०१९ मधील ५२९७ पदे पदे १००% भरण्यासाठी शासन निर्णयमधून सूट देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

◾️ या निर्णयाद्वारे कोणतीही नवीन पद निर्मिती करण्यात येत नसुन ही पदे मंजूर आकृतीबंधाच्या मर्यादेतील रिक्त पदांद्वारे भरण्यात यावीत.

◾️ सन २०२० मधील एकुण ७२३१ (६७२६ अधिक ५०५ पदे) पद भरतीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील.

शासन निर्णय डाउनलोड लिंक :-









शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन कार्यक्रम(PSLM)

 


         

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था (निपा), नवी दिल्ली अंतर्गत असलेल्या *राष्ट्रीय शालेय नेतृत्व विकास सेंटर (NCSL)* मार्फत तयार केलेल्या व *महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद* द्वारे *मराठी भाषांतरित आणि संदर्भिकृत* केलेल्या *शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन कार्यक्रमाची (PSLM)* औपचारिक सुरुवात *दिनांक ३ डिसेंबर २०२०* रोजी * मा. वंदना कृष्णा,* अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच *विशाल सोळंकी (भा.प्र.से.),* मा. आयुक्त शिक्षण, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, पुणे यांच्या उपस्थितीत झालेली आहे. हा कार्यक्रम देशभरातील *प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणस्तरावरील शाळाप्रमुख/पर्यवेक्षक/भावी मुख्याध्यापक तसेच भविष्यात शाळाप्रमुख होण्यासाठी इच्छुक असलेले ज्येष्ठ शिक्षक* यांच्यासाठी हा *ऑनलाईन कार्यक्रम* विनामूल्य उपलब्ध आहे. त्यानुसार राज्यभरातून सदर कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींचे मनस्वी अभिनंदन.

              *दिनांक १३ जानेवारी २०२१* रोजी *राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था(निपा), नवी दिल्ली* यांचेकडून *जिल्हानिहाय झालेल्या नोंदणीचा अहवाल* या कार्यालयास प्राप्त झालेला आहे. त्यानुसार राज्यभरातून १०५५३ नोंदणी झालेली आहे. यामध्ये *प्रथम क्रमांकावर कोल्हापूर जिल्ह्याची सर्वाधिक नोंदणी झालेली आहे* तर *त्याखालोखाल सोलापूर, नागपूर, मुंबई उपनगर व जळगाव अनुक्रमे अशी आघाडीवर असलेली जिल्हे आहेत.* तर इतर जिल्ह्यांची नोंदणी अल्पप्रमाणात आहे. नविन शैक्षणिक धोरण 2020 च्या पार्श्वभूमिवर शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन यासोबतच शालेय सुधारणा आणि परिवर्तन होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणस्तरावरील शाळाप्रमुख व ज्येष्ठ शिक्षक यांना या कार्यक्रमाचा लाभ व्हावा म्हणून सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक), प्राचार्य जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्था तसेच सर्व संबंधितांनी आपआपल्या स्तरावरून नोंदणीसाठी आवाहन व प्रोत्साहित करावे. 

              जिल्हानिहाय PSLM COURSE साठी नोंदणी केलेल्या सहभागी यांची संख्या

*९०१ ते १००० दरम्यान असलेले जिल्हे :* कोल्हापूर

*८०१ ते ९०० दरम्यान असलेले जिल्हे :* सोलापूर

*७०१ ते ८०० दरम्यान असलेले जिल्हे :* निरंक

*६०१ ते ७०० दरम्यान असलेले जिल्हे :* सातारा जळगांव मुंबई (उपनगर) आणि नागपूर

*५०१ ते ६०० दरम्यान असलेले जिल्हे :* पुणे आणि अमरावती

*४०१ ते ५०० दरम्यान असलेले जिल्हे :* निरंक

*३०१ ते ४०० दरम्यान असलेले जिल्हे :* अहमदनगर, सिंधुदुर्ग आणि ठाणे

*२०१ ते ३०० दरम्यान असलेले जिल्हे :* यवतमाळ, औरंगाबाद, नाशिक, चंद्रपूर, सांगली, मुंबई (शहर), रायगड आणि नंदुरबार

*१०१ ते २०० दरम्यान असलेले जिल्हे :* जालना, रत्नागिरी, भंडारा, गोंदिया, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, बीड, बुलढाणा आणि पालघर

*० ते १०० दरम्यान असलेले जिल्हे :* वर्धा, धुळे, वाशीम, लातूर, अकोला, परभणी आणि गडचिरोली  

           👉🏻 मिपा संस्थेचे अधिकृत फेसबुक पेज 

https://www.facebook.com/Maharashtra-State-School-Leadership-Academy-Miepa-100133188184315

तसेच

              👉YouTube चॅनेल लिंक 

https://youtu.be/g4MbLsJD5MA

              👉🏻 *PSLM कोर्स माहिती साठी YouTube link*

https://youtu.be/a6M_hLoielk

              👉🏻 शालेय नेतृत्व व व्यवस्थापन (Program on School Leadership and Management - PSLM) ऑनलाइन स्वरूपातील व राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था (निपा),* नवी दिल्ली *अधिकृत प्रमाणपत्र* देणारा कोर्स *मराठी, हिंदी व इंग्रजी* भाषेत राष्ट्रीय वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. हा कोर्स करण्यासाठी वेळेचे कोणतेही बंधन नसल्याने आपण आपल्या वेळेनुसार *२४x७* आपल्या *संगणक अथवा मोबाईलवर* देखील सहजपणे पूर्ण करू शकता. त्यासाठी पुढील दिलेल्या वेबपोर्टल वर नोंदणी करून स्वतःचे लॉगीन व पासवर्ड मुख्याध्यापकांनी तयार करावे आणि आणि कोर्स विहित मुदतीत सर्वच मुख्याध्यापकांनी पूर्ण करावा.

              *Program for School Leadership and Management – PSLM नोंदणीसाठी करण्यासाठी वेबपोर्टल लिंक* 👇👇👇👇👇👇👇

http://pslm.niepa.ac.in/


              *फेसबुक पेज व YouTube channel* ला आपण *Like व Subscribe* केल्यामुळे आगामी व उपलब्ध मार्गदर्शन संदर्भात *नोटिफिकेशन* मिळून अधिकाधिक संख्येने अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांना राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय तज्ञांचे मार्गदर्शनाचा लाभ होईल.

              👉🏻 रजिस्ट्रेशन, लॉगिन निर्मिती व कोर्स पूर्ण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक साहाय्य व मदतीसाठी कार्यालयीन वेळेत खालील तज्ञ व्यक्तींची दिलेल्या भ्रमणध्वनी नुसार मदत घेता येईल.

*श्री. धनंजय क्षिरसागर* :- 98 6044 3300

*श्री. ओमप्रकाश शेळके* :- 98 2229 0630*      


प्रसारक : शैक्षणिक परिवर्तन         

माहिती तंत्रज्ञानाचे आवर्तन,चला करूया शैक्षणिक परिवर्तन....                                                                                     

       *डॉ. नेहा बेलसरे*

                 संचालक

       महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन 

व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद