रविवार, ३१ जानेवारी, २०२१

उच्च शिक्षणातील कालमर्यादेची चौकट संपुष्टात


'श्रेयांक बँक’ संकल्पना पुढील वर्षांपासून : विषय, कालावधी निवडीचे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य

पदवीसाठी तीन वर्षे, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दोन वर्षे अशा उच्चशिक्षणातील कालमर्यादेच्या चौकटी आता संपुष्टात येणार आहेत. विद्यार्थी विविध विषयांचे श्रेयांक साठवून त्यानुसार प्रमाणपत्र, पदविका, पदवी हे शिक्षणाचे वेगवेगळे टप्पे आता पूर्ण करू शकतील. श्रेयांक साठवण्यासाठी ‘श्रेयांक बँके’ची संकल्पना पुढील वर्षांपासून अमलात आणण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मसुदा तयार केला आहे.

उच्च शिक्षणातील प्रमाणपत्रापासून ते पीएच.डीपर्यंतचे वेगवेगळे अभ्यास टप्पे पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आता ठरावीक कालमर्यादेचे बंधन राहणार नाही. हवे ते विषय शिकून त्याचे श्रेयांक विद्यार्थी साठवू शकतील. साठवलेले श्रेयांक गरजेनुसार वापरून वेगवेगळ्या टप्प्यातील शैक्षणिक मान्यता मिळवण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना मिळणार आहे. एका विषयाचे श्रेयांक विद्यार्थी सात वर्षांपर्यंत वापरू शकणार आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार ‘शैक्षणिक श्रेयांक बँक’ (अ‍ॅकॅडमिक क्रेडिट बँक) स्थापन करण्यासाठी आयोगाने मसुदा केला आहे. त्यामुळे विषय निवडीचे आणि कालमर्यादा निवडण्याचे स्वतंत्र्यही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. कोणत्याही टप्प्यावर शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मिळवलेल्या श्रेयांकानुसार प्रमाणपत्र किंवा पदविका मिळू शकेल. येत्या शैक्षणिक वर्षांपासून (२०२१-२२) श्रेयांक बँक स्थापन होणार असून राष्ट्रीय मूल्यांकन आणि श्रेयांकन प्रणालीकडून (नॅक) ‘अ’ श्रेणी मिळालेले महाविद्यालय किंवा विद्यापीठाला या योजनेत सहभागी होता येईल.

सध्या ढोबळपणे पदवी अभ्यासक्रम तीन वर्षे, पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन वर्षे अशा कालमर्यादेच्या चौकटी आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमांत ठरावीक वर्षांत, ठरावीक विषय शिकण्याचेही बंधन आहे. आता विद्यार्थी त्यांना हवे ते विषय निवडून त्याचे श्रेयांक मिळवू शकतील. प्रत्येक विषयाचे श्रेयांक मिळवण्यासाठी ठरावीक तास शिक्षण पूर्ण करणे, प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक आहे. श्रेयांक बँकेतील खात्यात विद्यार्थी त्यांचे श्रेयांक जमा करू शकतील. प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अशा प्रत्येक टप्प्यासाठी निश्चित करण्यात आलेले श्रेयांक खात्यात साठल्यावर विद्यार्थी त्यांच्या गरजेनुसार त्यांचा वापर करू शकतील. एका विषयाचे श्रेयांक सात वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना वापरता येऊ शकतील. त्याचप्रमाणे एका विषयाचे श्रेयांक एका टप्प्यासाठी वापरल्यास ते दुसऱ्या टप्प्यासाठी वापरता येणार नाहीत.

विषय निवडीचे स्वातंत्र्य : विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय आणि संस्था निवडण्याचे स्वातंत्र्य मिळू शकणार आहे. त्यासाठी विद्याशाखांचे बंधन असणार नाही. ‘श्रेयांक बँके’शी जोडल्या गेलेल्या कोणत्याही संस्थेत विद्यार्थी शिकू शकतील. ज्या विद्यापीठात विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली असेल तेथील अभ्यासक्रम आराखडय़ानुसार ५० ते ७० टक्के श्रेयांक आणि इतर विद्यापीठ किंवा संस्थेतून ३० ते ५० टक्के श्रेयांक विद्यार्थी मिळवू शकतील. एखाद्या विशिष्ट विद्याशाखेतील पदवी मिळवण्यासाठी त्या शाखेतील महत्त्वाच्या विषयांचे श्रेयांक मिळवणे बंधनकारक असेल. पदवी घेण्यासाठी पुरेसे श्रेयांक आहेत. परंतु ते एका कोणत्याही विशिष्ट शाखेतील नाहीत अशा विद्यार्थ्यांना पदवी हवी असल्यास ‘लिबरल आर्टस’मधील पदवी देण्यात येईल.

विद्यार्थ्यांना कोणताही विषय, कुठेही शिकण्याचे आणि त्यासाठी कालावधीही ठरवण्याचे स्वातंत्र्य ‘अ‍ॅकॅडमिक क्रेडिट बँक’ या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. देशाच्या उच्चशिक्षणातील येऊ घातलेल्या बदलांची ही नांदी आहे. या योजनेत सहभागी होऊनही त्याचे नियम न पाळणाऱ्या संस्थांवर कारवाईची तरतूदही मसुद्यात आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEW EDUCATION POLICY NEP-2020) pdf डाऊनलोड लिंक :


- डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग

- लोकसत्ता न्युज नेटवर्क


शनिवार, ३० जानेवारी, २०२१

भारतीय रिजर्व बैंक भरती - २०२१


1) RBI Bharti 2021 : भारतीय रिजर्व बँक सेवा मंडळ अंतर्गत अधिकारी ग्रेड बी पदाच्या एकूण 322 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे.

पदाचे नाव – अधिकारी ग्रेड बी

पद संख्या – 322 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

फीस

SC/ST/PwBD – रु. 100/-

GEN/OBC/EWSs – रु. 850/-

अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 जानेवारी 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट www.rbi.org.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RBI Bharti 2021

 PDF जाहिरात : http://bit.ly/39nYRgA

ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/3cjqGZy

==================================

2) RBI Bharti 2021 : भारतीय रिजर्व बँक सेवा मंडळ अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत) पदाच्या एकूण 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे.

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत)

पद संख्या – 48 जागा

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 फेब्रुवारी 2021 आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईटwww.rbi.org.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RBI Bharti 2021

 PDF जाहिरात : http://bit.ly/2NOF0yV

ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/2Yf2Vtk

==================================

3) RBI Bharti 2021 : भारतीय रिजर्व बँक अंतर्गत सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण 241 (मुंबई – 84, नागपूर – 12) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2021 आहे.

पदाचे नाव – सुरक्षा रक्षक

पद संख्या – 241 जागा (मुंबई – 84, नागपूर – 12)

शैक्षणिक पात्रता – passed 10th Standard (S.S.C./Matriculation)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 जानेवारी 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईटwww.rbi.org.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For RBI Bharti 2021

PDF जाहिरात : http://bit.ly/39XYbNY

ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/39XYbNY

स्त्रोत - महाभरती

==================================

शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

भारतीय पोस्ट विभाग भरती -२०२१



Indian Post Bharti 2021: 

     भारतीय डाक विभाग येथे ग्रामीण डाक सेवक  पदाच्या एकूण 233 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे.

    अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2021 आहे. 

  • पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
  • पद संख्या – 233 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
  • फीस –
    • OC/OBC/EWS Male / trans-man – रु. 100/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 जानेवारी 2021 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

Indian Post Bharti 2021

🔘अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF Link जाहिरात वाचावी...


🔘 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा...

⭕ लिंक : https://appost.in/gdsonline/

स्रोत - महाभरती

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

बालभारतीची स्वतंत्र वाहिनी सुरू होणार...


📝 बालभारतीची स्वतंत्र वाहिनी सुरू होणार....

वर्षभरात बालभारतीची स्वतंत्र वाहिनी सुरू करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी बुधवारी केली. तसेच बालचित्रवाणीच्या संग्रहातील शिक्षणपूरक कार्यक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली.

बालभारतीचा ५४ वा वर्धापन दिन आणि किशोर मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष कार्यक्रमात गायकवाड बोलत होत्या. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, बालभारतीचे संचालक दिनकर पाटील, साहित्यिक इंद्रजित भालेराव, नियंत्रक विवेक गोसावी, काँग्रेस नेते उल्हास पवार आदी या वेळी उपस्थित होते. सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त ‘किशोर’च्या मोबाइल अ‍ॅप आणि बोधचिन्ह, पन्नास किशोर गोष्टी हे पुस्तक, बालभारतीचे नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे बालरक्षक चळवळीतील अनुभवांवर आधारित ‘नवी पहाट’, प्रयोगशील शाळांची माहिती देणाऱ्या ‘शिक्षणाच्या नव्या वाटा’ या पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले. व्हच्र्युअल क्लासरूमच्या माध्यमातून राज्यभरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम पाहिला.

बालभारती आणि किशोरचा आयुष्यावर खूप मोठा प्रभाव असल्याचे सांगून गायकवाड म्हणाल्या, की करोनामुळे निर्माण झालेल्या अडचणींतही न डगमगता बालभारतीने छपाई ते वितरणाचे काम केले. करोना हे आव्हान आहे, तशीच संधीही आहे. या निमित्ताने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला. करोना काळात बालचित्रवाणीसारख्या शैक्षणिक वाहिनीची गरज जाणवली. त्यामुळे बालभारतीची स्वतंत्र वाहिनी वर्षभरात निर्माण करण्यात येईल. तसेच बालचित्रवाणीतील शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल.

⭕ किशोरची वर्गणी पन्नास रुपये

सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त बालवाचकांना भेट म्हणून किशोरची वार्षिक वर्गणी ५० रुपये करण्यात आली आहे. ५० रुपये वर्गणीत दिवाळी अंकासह वर्षभराचे अंक मिळतील. नवीन अ‍ॅप आणि संके तस्थळाद्वारे वार्षिक वर्गणी भरता येईल, असे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांनी सांगितले.

⭕ दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन

राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, समुपदेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या (डीआयईटी) प्रशिक्षित शिक्षकांतर्फे विद्यार्थ्यांचे समुपदेशन, मार्गदर्शन करण्यात येईल. समुपदेशकांची यादी जाहीर करण्यात येईल, असेही गायकवाड यांनी नमूद केले.

स्रोत - लोकसत्ता न्युज नेटवर्क

पदवीधरांना मोठी संधी–CAG च्या 10811 जागांसाठी भरती होणार.....


पदवीधरांना मोठी संधी – CAG च्या 10811 जागांसाठी भरती होणार..... 

CAG Recruitment 2021 : भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विभाग – म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक पदासाठी 10811 (महाराष्ट्र – लेखा परीक्षक : 277 / लेखापाल : 336) जागांसाठी भरती जाहिरात लवकरच येणार आहे . ऑडीटर आणि अकाऊंटट पदासाठीची “प्रतिक्रिया नोटीफिकेशन” cag.gov.in. वर निघाली आहे. ज्यांना CAG च्या या जागांसाठी प्रयत्न करायचा आहे, त्यांच्यासाठी या लेखात इत्यंभूत माहिती आहे. 19 फेब्रुवारी 2021 ही टिप्पणी अर्ज करू शकतात. फक्त पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. उमेदवारांना वेबसाईटवर जाऊन Auditor, Accountant Application Form 2021 डाऊनलोड करुन, तो भरुन सबमिट करावा लागेल. “या भरती संदर्भातील पदभरती जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे.”

पदाचे नाव – ऑडीटर आणि अकाऊंटट

पद संख्या – 10811 जागा (महाराष्ट्र – लेखा परीक्षक : 277 / लेखापाल : 336)

शैक्षणिक पात्रता – Graduate

अर्ज पद्धती – ऑफलाईन

वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे

टिप्पणी अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री व्ही. एस. वेंकटानाथन, सहाय्यक सी आणि एजी (एन), ओ / ओ सीएजी ऑफ इंडिया, 9, दिनदयाल उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली – 110124

टिप्पणी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 फेब्रुवारी 2021 आहे.

रिक्त पदांचा तपशील – CAG Vacancies 2021

ऑडीटर - 6409

अकाऊंटट - 4402

सदर जाहिरातीची “प्रतिक्रिया नोटीफिकेशन” पीडीएफ डाउनलोड करा. 👇👇👇


अधिकृत वेबसाईट : cag.gov.in

नोट : ही भरती जाहिरात नाही आहे, सध्या फक्त आपल्या प्रतिक्रिया मागविल्या आहेत, पूर्ण भरती जाहिराती लवकरच येणे अपेक्षित आहे. 

टीप : अशाच प्रकारे विविध प्रकारच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक विविध प्रकारची माहिती जाणून घेण्याकरिता या ब्लॉगला फॉलो करा.

स्रोत - महाभरती

बुधवार, २७ जानेवारी, २०२१

पद्म पुरस्कार‌ जाहीर - २०२१


प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, सोमवारी केंद्र सरकारमार्फत पद्म पुरस्कार‌ जाहीर - २०२१

🔴 पार्श्वभूमी :-

🔰 26 जानेवारी 2021 रोजी भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला.

🔰 यंदाच्या पथप्रदर्शनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे बांगलादेशाच्या सैन्याची तुकडी आणि बॅंड. ऐतिहासिक मुक्तीच्या 50 वर्षांच्या स्मृतिदिनानिमित्त पहिल्यांदाच बांगलादेशाच्या त्रि-सेवांमधील 122 सैनिकांची मार्चिंग तुकडी व बँडने पथप्रदर्शनामध्ये भाग घेतला.

🔰 राष्ट्रीय ध्वजाला 21 तोफांची सलामी दिल्यानंतर, लष्करातील पराक्रमी, शूर सैनिकांना शौर्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले. याप्रसंगी, दरवर्षीप्रमाणे देशातली लष्करी ताकद आणि विविध क्षेत्रातील कृत्ये, राज्यांमधील असलेल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन, संरक्षण प्रणाली यांचे प्रजासत्ताक दिन पथप्रदर्शनामधून प्रदर्शित केले गेले.

🔰 प्रत्येक वर्षी 26 जानेवारी या दिवशी भारत आपला प्रजासत्ताक दिन साजरा करतो. 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारत ब्रिटिश सरकारपासून स्वतंत्र झाला. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी ‘भारत सरकार कायदा-1935’ संपुष्टात येऊन भारताचे स्वतंत्र संविधान अस्तित्वात आले. भारत सार्वभौम झाला. तेव्हापासून भारत देश हा संविधानानुसार चालतो. हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो.

◾️प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, सोमवारी केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली.

◾️ महाराष्ट्रातील सहा जणांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. 

🔴 पद्मश्री :-

🔹 सिंधूताई सपकाळ (सामाजिक कार्य)

🔹 गिरीश प्रभुणे (सामाजिक कार्य)

🔹 नामदेव कांबळे (साहित्य)

🔹 परशूराम गंगावणे (साहित्य)

🔹 जसवंती बेन जमनादास पोपट (उद्योग)

🔹 रजनीकांत श्रॉफ

 🔴 पद्मभूषण :-

🔹 समित्रा महाजन (माजी लोकसभा सभापती)

🔹 रामविलास पासवान (दिवंगत नेते, लोक जनशक्ती पक्ष)

🔹 तरुण गोगोई (दिवंगत नेते, आसामचे माजी मुख्यमंत्री)

🔹 कल्बे सादिक (दिवंगत मुस्लिम नेते)

🔴 पद्मविभूषण :-

🔹 शिंजो आबे (जपानचे माजी पंतप्रधान)

🔹 एस. पी. बालसुब्रमण्यम (दिवंगत, गायक-संगीतकार)

🔹 सदर्शन साहो (सँड आर्टिस्ट)

🔹 बी. बी. लाल (पुरातत्वशास्त्रज्ञ)

 ◾️ या यादीत २९ महिलांचा समावेश आहे. 

◾️ १६ जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.


विशेष सेवेसाठी राज्यातील ५७ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाले ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र शासनाने महाराष्ट्र पोलीस दलातील ५७ अधिकारी, अंमलदारांची शौर्य पदकासाठी, उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांसाठी आणि गुणवत्तापूर्ण सेवेप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पोलीस पदकासाठी निवड केली. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

“शौर्य, कर्तबगारीमध्ये महाराष्ट्र पोलीस नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यामुळेच आपल्या पोलिसांनी गणराज्यदिनी १३ शौर्य पदके, विशेष सेवेची ४ पदके तर गुणवत्तापूर्ण सेवेबद्दलची ४० पदके पटकावली आहेत. खास सेवेसाठी एकूण ५७ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाले आहे.” असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

तसेच, “पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख नात्याने या सर्वांचा मला सार्थ अभिमान वाटतो. सर्व सन्मानित पोलीस अधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन! त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!” असं म्हणत त्यांनी पदक मिळवणाऱ्या पोलिसांचे अभिनंदन देखील केलं आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रभात कुमार, ‘फोर्स वन’चे अतिरिक्त महासंचालक सुखविंदर सिंह आणि पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांचा पदक विजेत्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे.

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन...



भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान’; मुख्यमंत्र्यांनी त्या पाच मुलांचं केलं विशेष कौतुक....

‘महाराष्ट्राची माती गुणी रत्नांची खाण आहे. त्यावर विविध क्षेत्रातील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पटकावून आपल्या मुलांनी शिक्कामोर्तब केले आहे,' अशा शब्दांमध्ये मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. ‘भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे,’ अशी शाबासकी देत मुख्यमंत्र्यांनी सर्व पुरस्कार विजेत्या मुलांचे कौतुकही केलं आहे.

भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून नवनिर्माण, शैक्षणिक यश, क्रीडा, कला आणि संस्कृती ,समाज सेवा, आणि शौर्य या क्षेत्रात अपवादात्मक क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना दर वर्षी विशेष पुरस्कार प्रदान केले जातात. यंदा देशभरातील ३२ बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२१ प्रदान करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच मुलांचा समावेश आहे. धाडशी कामगिरीचा शौर्य पुरस्कार - कामेश्वर वाघमारे (जि. नांदेड), नवनिर्माणासाठी श्रीनभ अग्रवाल (नागपूर) व अर्चित पाटील (जळगाव), शैक्षणिक प्रकल्पासाठी सोनित सिसोलेकर (पुणे) आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी काम्या कार्तिकेयन (मुंबई) या पाच जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कामेश्वर या चौदा वर्षीय बहादूर मुलाने आपल्या जीवाची पर्वा नदीच्या पाण्यात बुडणाऱ्या दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला होता. त्याच्या या धाडसाचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यापुर्वीच कौतुक केले होते. त्याला या धाडसाबद्दल प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार मिळाल्याबद्दल, मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केलं आहे.

अभिनंदन संदेशात मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राची माती गुणी रत्नांची खाण आहे. हेच आपल्या मुलांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पटकावून सिद्ध केले आहे. बहादुरीच्या आणि लढवय्येपणात महाराष्ट्र मागे हटत नाही. तसाच तो नवनिर्माण आणि प्रयोगशीलतेतही पुढेच आहे. शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातही महाराष्ट्राची कामगिरी नेहमीच दिमाखदार राहीली आहे. या क्षेत्रात आपली नवी पिढीही तितक्याच उमेदीने आणि पुढे जात आहे. याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. पुरस्कार प्राप्त या मुलांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे, असेही म्हणावे वाटते. पुरस्कारप्राप्त या मुलांमध्ये ही जिद्द आणि चिकाटी निर्माण करणारे त्यांचे कुटुंबीय, पालक तसेच शिक्षक, मार्गदर्शकही कौतुकास पात्र आहेत. त्यासाठी या सर्वांचे आणि पुरस्कार विजेत्या मुलांचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि त्यांच्या पुढील वाटचालीसही शुभेच्छा देतो, असं म्हणत सर्वांचेच कौतुक केलं आहे.