मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन...



भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान’; मुख्यमंत्र्यांनी त्या पाच मुलांचं केलं विशेष कौतुक....

‘महाराष्ट्राची माती गुणी रत्नांची खाण आहे. त्यावर विविध क्षेत्रातील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पटकावून आपल्या मुलांनी शिक्कामोर्तब केले आहे,' अशा शब्दांमध्ये मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. ‘भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे,’ अशी शाबासकी देत मुख्यमंत्र्यांनी सर्व पुरस्कार विजेत्या मुलांचे कौतुकही केलं आहे.

भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून नवनिर्माण, शैक्षणिक यश, क्रीडा, कला आणि संस्कृती ,समाज सेवा, आणि शौर्य या क्षेत्रात अपवादात्मक क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना दर वर्षी विशेष पुरस्कार प्रदान केले जातात. यंदा देशभरातील ३२ बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२१ प्रदान करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच मुलांचा समावेश आहे. धाडशी कामगिरीचा शौर्य पुरस्कार - कामेश्वर वाघमारे (जि. नांदेड), नवनिर्माणासाठी श्रीनभ अग्रवाल (नागपूर) व अर्चित पाटील (जळगाव), शैक्षणिक प्रकल्पासाठी सोनित सिसोलेकर (पुणे) आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी काम्या कार्तिकेयन (मुंबई) या पाच जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कामेश्वर या चौदा वर्षीय बहादूर मुलाने आपल्या जीवाची पर्वा नदीच्या पाण्यात बुडणाऱ्या दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला होता. त्याच्या या धाडसाचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यापुर्वीच कौतुक केले होते. त्याला या धाडसाबद्दल प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार मिळाल्याबद्दल, मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केलं आहे.

अभिनंदन संदेशात मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राची माती गुणी रत्नांची खाण आहे. हेच आपल्या मुलांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पटकावून सिद्ध केले आहे. बहादुरीच्या आणि लढवय्येपणात महाराष्ट्र मागे हटत नाही. तसाच तो नवनिर्माण आणि प्रयोगशीलतेतही पुढेच आहे. शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातही महाराष्ट्राची कामगिरी नेहमीच दिमाखदार राहीली आहे. या क्षेत्रात आपली नवी पिढीही तितक्याच उमेदीने आणि पुढे जात आहे. याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. पुरस्कार प्राप्त या मुलांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे, असेही म्हणावे वाटते. पुरस्कारप्राप्त या मुलांमध्ये ही जिद्द आणि चिकाटी निर्माण करणारे त्यांचे कुटुंबीय, पालक तसेच शिक्षक, मार्गदर्शकही कौतुकास पात्र आहेत. त्यासाठी या सर्वांचे आणि पुरस्कार विजेत्या मुलांचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि त्यांच्या पुढील वाटचालीसही शुभेच्छा देतो, असं म्हणत सर्वांचेच कौतुक केलं आहे.

डिजीटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड कसे करायचे?

डिजीटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया......

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त डिजीटल मतदान ओळखपत्र (Digital Voter Card) जारी करणार आहे. डिजीटल वोटर कार्ड आज (25 जानेवारी) अधिकृतपणे जारी केले जाणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरुन मतदार आपले व्होटर कार्ड पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करु शकतात. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांच्यानंतर आता मतदान ओळखपत्रही डिजीटल स्वरुपात उपलब्ध होत आहे. (ECI launches Digital Voter Card from 25th January know how to download)

पाच राज्यांच्या निवडणुकीपूर्वी डिजीटल वोटर कार्डचे लाँचिंग

येत्या काही महिन्यांमध्ये पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.

पहिल्या टप्प्यात नव्या मतदारांना डिजीटल वोटर कार्ड

पहिल्या टप्प्यात 25 ते 31 जानेवारी दरम्यान नव्या मतदारांना डिजीटल वोटर कार्ड मिळणार आहे. या कालावधीमध्ये जे मतदार नव्याने नोंदणी करतील, त्यांना डिजीटल वोटर कार्ड मिळेल.

मोबाईल नंबर रजिस्टर असल्यास 1 फेब्रुवारीपासून डिजीटल कार्ड

ज्या मतदारांचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे नोंदवलेला असेल, त्यांना 1 फेब्रुवारीपासून डिजीटल वोटर कार्ड मिळणार आहे. ज्यांचा क्रमांक निवडणूक आयोगाकडे रजिस्टर नाही, त्यांना तो निवडणूक आयोगाकडून पडताळणी करुन घ्यावा लागणार आहे.

पीडीएफ स्वरुपात मिळणार डिजीटल कार्ड

सर्व मतदारांना डिजीटल कार्ड पीडीएफ स्वरुपात मिळेल. नव्या मतदारांना दोन्ही स्वरुपातील मतदान कार्ड मिळणार आहे. मतदार आपले डिजीटल वोटर कार्ड डिजीलॉकर (Digilocker) मध्येही सेव्ह करुन ठेवू शकतात. (ECI launches Digital Voter Card from 25th January know how to download)

डिजीटल वोटर कार्ड कसे डाऊनलोड कराल?

https://voterportal.eci.gov.in/ किंवा https://nvsp.in/Account/Login 

या वेबसाईटवर लॉगइन करा....

वेबसाईटवर आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीद्वारे अकाऊंट तयार करा

 E-EPIC डाऊनलोड करा....

25 जानेवारीला सकाळी 11.14 वाजल्यापासून ही सुविधा उपलब्ध असेल.....

साभार - TV9

कविता - प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!

 

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!


भारतीय संविधान सर्वमान्य राहो।

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ।। धृ।।


अजूनही कळाली ना लोकशाही।

अविचाराने फोफावली तानाशाही।।

न्यायासाठी जनता फोडतेय टाहो।

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ।।१।।


खरचं झालो का आपण सार्वभौम।

जातीवादी प्रवृत्तीने लुटतेय कौम।।

स्वातंत्र्याची स्वप्ने उघड्या डोळ्यांनी पाहो।

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ।।२।।


मिळतेय कां समान दर्जा आणि संधी।

विद्येचा दिवा पेटला कां घराघरामंधी।।

आम्हां सर्वांच्या घरी सुखाचे दिन येवो।

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ।।३।।


चेतवा जनमनात संघर्षमय क्रांती।

भिमारायाने दिलीया बुद्धाची शांती।।

प्रज्ञा शील करुणेचा मार्ग दावो।

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ।।४।।


संविधानाचं सर्वांना मिळालं हो दानं।

ज्यामुळे मिळाले न्याय हक्क समान।। 

प्रवर्तन सर्वांचेच जयमंगल होवो।

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो ।।५।।


कवी- संदिप अंबादास शेंडे (प्रा.शि)

         शासकीय माध्यमिक आश्रमशाळा

         कोलितमारा,ता.पारशिवनी,जि.नागपूर

मो.नं. ८३२९८९२९८४

सोमवार, २५ जानेवारी, २०२१

राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 (National Toy Fair)

 


राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 (National Toy Fair 2021) च्या अनुषंगाने सहभाग घेणे, स्वनिर्मित खेळणीचे फोटो आणि व्हिडिओ लिंक भरणे व शेअर करणे.‌..

        विविध प्रकारचे खेळ व खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षक यांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला चालना देणे व ती सादर करण्याची संधी देण्याच्या हेतूने आर्ट्स आणि अॅथेटिक्स विभाग राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांचे मार्फत देशातील पहिली राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 (National Toy Fair 2021) ऑनलाइन पद्धतीने दिनांक 27/02/2021 ते 02/03/2021 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.

        यामधील राज्यभरातील निवडक विद्यार्थी शिक्षक व अधिकारी यांनी तयार केलेल्या प्रत्यक्ष खेळणी किंवा डिजिटल ॲप्स यांचे फोटो व्हिडिओज आणि तपशील खालील लिंकवर भरावा.


👆👆👆वरील लिंकवर माहिती भरण्यासाठी अंतिम दि. 10/02/2021. 

      अधिक माहितीसाठी खाली दिलेले शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांचे परिपत्रक वाचा व डाऊनलोड करा.


केंद्रीय अर्थसंकल्प यंदा कागदमुक्त

जानेवारी २५ - केंद्रीय अर्थसंकल्प यंदा कागदमुक्त

मोबाइल अ‍ॅपद्वारे खासदार, नागरिकांना दस्तावेज....

अर्थसंकल्पाच्या दस्तऐवजाच्या संकलनाची सुरुवात ज्या कार्यक्रमाद्वारे केली जाते त्या प्रतीकात्मक ‘हलवा समारंभा’त शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर सहभागी झाले होते.

यंदा करोना निर्बंधांमुळे अर्थसंकल्पाच्या दस्तऐवजाची छपाई केली जाणार नसून खासदारांना त्याचे इलेक्ट्रॉनिक वितरण करण्यात येणार आहे. यापूर्वी हलवा कार्यक्रमाने अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात केली जात होती. स्वातंत्र्यानंतर यंदा प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्पातील मिळकत आणि खर्च याबाबतचे दस्तऐवज, त्याचबरोबर वित्त विधेयक, नव्या करांबाबतचा सविस्तर तपशील आणि नव्या आर्थिक वर्षासाठीच्या अन्य उपाययोजनांबाबतच्या दस्तऐवजाची छपाई करण्यात येणार नाही. केंद्रीय अर्थसंकल्प (२०२१-२२) यंदा प्रथमच कागदविरहित पद्धतीने सादर केला जाणार आहे. संसदेत १ फेब्रुवारी २०२१ रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. खासदारांना आणि जनतेला अर्थसंकल्पाचा दस्तऐवज सहज उपलब्ध व्हावा यासाठी अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल-अ‍ॅपसेवा सुरू केली आहे.

साभार - लोकसत्ता न्युज नेटवर्क

प्रजासत्ताक दिनापासून राज्यात ‘कारागृह पर्यटन’


January 24, - प्रजासत्ताक दिनापासून राज्यात ‘कारागृह पर्यटन’


भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार असलेली कारागृहे पाहण्यासाठी गृहविभागाद्वारे ‘कारागृह पर्यटन’ सुरू करण्यात येणार आहे. येत्या २६ जानेवारीपासून येरवडा कारागृह पर्यटनासाठी खुले करण्यात येणार असून या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी दिली.

भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रातील कारागृहांना अनन्यसाधारण स्थान आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाच्या नेत्यांना ब्रिटिशांनी येरवडा, ठाणे, नाशिक, धुळे व रत्नागिरी येथे कैद करून ठेवले होते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू, सुभाषचंद्र बोस या नेत्यांना ब्रिटिशांनी येरवडा कारागृहात कैदेत ठेवले होते. या थोर नेत्यांच्या कारावासाची ठिकाणे स्मारक म्हणून जतन करण्यात आलेली आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये प्रसिद्ध असा पुणे करार येरवडा कारागृहात गांधी यार्ड असलेल्या आंब्याच्या झाडाखाली झाला. त्या झाडाची सुद्धा योग्य प्रकारे देखभाल करण्यात येत आहे. सन १८९९ मध्ये चापेकर बंधूना येरवडा कारागृहातच फाशी देण्यात आली.

शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थांना ही ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत या दृष्टिकोनातून गृह विभाग याद्वारे प्रथमच ‘कारागृह पर्यटन’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थी आणि शैक्षणिक आस्थापना, अशासकीय संस्थाच्या प्रतिनिधींना भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आणि येरवडा कारागृहात घडलेल्या इतर ऐतिहासिक घटना पाहता व अनुभवता येतील.

पर्यटकांना माहिती देण्यासाठी पर्यटन मार्गदर्शक पुरविला जाईल. दररोज ५० पर्यटकांना भेटीची परवानगी देण्यात येणार आहे. ही योजना लवकरच राज्यातील इतर कारागृहातही राबविण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.

साभार - लोकसत्ता न्युज नेटवर्क

भारत - राज्य व त्यांचे स्थापना दिन

 


🇮🇳 भारत - राज्य व त्यांचे स्थापना दिन :-

🇮🇳 अरुणाचल प्रदेश : २० फेब्रुवारी

🇮🇳 मिझोरम : २० फेब्रुवारी

🇮🇳 आसाम : २ डिसेंबर

🇮🇳 बिहार : १२ मार्च

🇮🇳 आंध्रप्रदेश : १ नोव्हेंबर

🇮🇳 छत्तीसगड : १ नोव्हेंबर

🇮🇳 हरियाणा : १ नोव्हेंबर

🇮🇳 कर्नाटक : १ नोव्हेंबर

🇮🇳 केरळ : १ नोव्हेंबर

🇮🇳 मध्यप्रदेश : १ नोव्हेंबर

🇮🇳 पंजाब : १ नोव्हेंबर

🇮🇳 तमिळनाडू : १ नोव्हेंबर

🇮🇳 गोवा : ३० मे

🇮🇳 महाराष्ट्र : १ मे

🇮🇳 गुजरात : १ मे

🇮🇳 ओडिशा : १ एप्रिल

🇮🇳 हिमाचल प्रदेश : १५ एप्रिल

🇮🇳 झारखंड : १५ नोव्हेंबर

🇮🇳 मणिपूर : २१ जानेवारी 

🇮🇳 मेघालय : २१ जानेवारी

🇮🇳 त्रिपुरा : २१ जानेवारी

🇮🇳 नागालँड : १ डिसेंबर

🇮🇳 राजस्थान : ३० मार्च

🇮🇳 सिक्कीम : १६ मे

🇮🇳 तेलंगणा : २ जुन

🇮🇳 उत्तरप्रदेश : २५ जानेवारी

🇮🇳 उत्तराखंड : ९ नोव्हेंबर

🇮🇳 पश्चिम बंगाल : २० जुन .

- शैक्षणिक परिवर्तन